नारायणगाव- शिरोली बुद्रुक येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून स्वामी समर्थ सेवेकरी आणि पंचक्रोशीतील सर्व स्वामी सेवेकरी, कबाडवाडी येथील महिला भगिनींनी मोठ्या भक्तिभावाने चंडीयागाचे आयोजन केले होते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात सुख व शांती लाभावी, मानवाचे जीवन सुकर व्हावे या उद्देशाने चंडीयागाचे आयोजन करण्यात आले होत, अशी माहिती केंद्रप्रमुख जी. एम. उकिर्डे यांनी दिली. होम-हवन आणि यज्ञविधी करून स्वामींची आरती, देवीची आरती आणि अंबा माता की जय या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख जी. एम. उकिर्डे, तसेच अजित गवळी, अर्चना सोमवंशी, वैभव सोमवंशी, स्वप्नील लोहोकरे, रुपेश दरेकर, धनंजय उकिर्डे, तसेच ग्रामस्थ मंडळी यांनी केले होते.