Chandrashehar Bawankule – राज्यातील मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राज्यातील वातावरण आता चांगलेच तापताना दिसत आहे. कारण मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पाटील 25 ऑक्टोबर पासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. याआधी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले होते.
चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या हस्ते फळांचा रस घेऊन 14 सप्टेंबरला 17 दिवसांचे उपोषण सोडले. यावेळी मराठा आरक्षणासाठी निर्णय घेण्यासाठी सरकारला महिनाभराचा कालावधी देण्यात आला होता.
मात्र 40 दिवसांनंतरही सरकारने कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे. तसेच पुढाऱ्यांनांही गावबंदी करण्यात येणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं आहे.
त्यामुळे मराठा समाजाने राजकीय पुढार्यांना घातलेली गाव बंदी ही अयोग्य असल्याचं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashehar Bawankule) यांनी व्यक्त केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “राज्यातील सर्वच पक्षांची भूमिका ही मराठा आरक्षण मिळावं हीच आहे. मात्र हे आरक्षण देताना कोणावरही अन्याय होणार नाही, अशी सर्व राजकीय पक्षांची स्पष्ट भूमिका आहे.
त्यामुळे मराठा समाज हा सुसंस्कृत म्हणून ओळखला जात असताना अशाप्रकारे गावात राजकीय पक्षांना बंदी घालणं हे अयोग्य असल्याचं बावनकुळे (Chandrashehar Bawankule) म्हणाले.