मुंबई – लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांची बाजू घेऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घेणाऱ्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना केंद्रातील मोदी सरकारने रडारवर घेतले आहे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सुरक्षेत्सव प्रियंका यांना देण्यात आलेला सरकारी बंगला रिकामी करण्याची नोटीस केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने बजावली आहे.
यूपीमध्ये भाजपला सळो की पळो करून सोडल्यामुळेच प्रियंका यांना नोटीस बजावण्यात आल्याचे मानले जात आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला रिकामा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने यासंदर्भात तसे पत्र प्रियंका गांधी यांना दिले आहे. सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी त्यांना एका महिन्याचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे 1 ऑगस्टपर्यंत त्यांना हा सरकारी बंगला रिकामा करावा लागणार आहे.