नाशिक – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राऊत यांच्या अडचणी वाढल्यावच दिसून येत आहे. महाष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या निकालनंतर राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.
तसेच सर्वोच्च न्यायलयाने काय म्हटलं हे सांगताना, राज्यातील सरकार हे अपात्र आमदारांच्या भरवशावर असल्याने ते बेकायदेशीर आहे. त्यामुळे असल्याने पोलीस आणि अन्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशाचे पालन करू नये असे आवाहन केले होते. असं आवाहन संजय राऊत यांनी केलं होत.
आणि आता याच आवाहनाविरोधात नाशिक पोलिसांनी संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संजय राऊतांवर कलम 505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये किती मोठी वाढ होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नेमकं संजय राऊत काय म्हणाले होते….
महाष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या निकालनंतर राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “राज्यातील सरकार अपात्र आमदारांच्या भरवशावर आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बेकायदेशीर ठरवलं आहे. त्यामुळे जनतेने घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असलेल्या सरकारच्या नियमांचे पालन करू नये, असं आवाहन संजय राऊतांनी केलं होतं.