नगर – सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शहरासह उपनगरात बहुतांशी ठिकाणी अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झालेली आहे. खड्ड्यांच्या रस्त्यावरवरून लोकसभेचा प्रचार होणार का?अशी विचारणा नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे लोकसभेनंतर तरी रस्त्यांची कामे मार्गी लागतील का, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
शहरासह उपनगरात खड्ड्यात रास्ता की खड्ड्यानचा रास्ता आहे हेच समजत नाही. निवडणूक आचारसंहितेच्या आधी मनपाने दोन दिवसांच्या अंतरांत ११९ निविदा प्रस्तावित केल्या. यात ९५ बत टक्के कामे ही रस्त्यांची आहेत. या निविदा सध्या प्रक्रियेमध्ये आहेत. त्यामुळे सध्या तरी मंजूर झालेल्या निधीतून रस्त्यांची कामे सुरू होणार नाहीत. आचारसंहितेच्या आधी काम सुरू झालेले २० रस्ते आहेत. यातील बहुतांशी रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. शहरातील मुख्य रस्ते चकाचक दिसत असले तरी अंतर्गत रस्त्यांची अवस्था वाईट आहे. बहुतांश ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी खडी घेऊन वरती आलेली आहे. त्यामुळे या साहेब रस्त्यांवरून वाहतूक धोकादायक आहे. बनली आहे. सध्या लोकसभेची आचारसंहिता आहे. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतरच मनपा फेरनिविदा काढणार आहे. तोपर्यंत नगरकरांना खड्यांतूनच प्रवास करावा लागणार आहे.
अर्धवट पॅचिंग
झोपडी कॅन्टीन ते गंगा उद्यानापर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. मागच्या पावसाळ्यात पॅचिंग केले परंतु अर्धवट असल्याने पावसाच्या पाण्यात वाहून गेले. पॅचिंगसाठी फेरनिविदा काढावी लागणार पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे पॅचिंग केले जाते. यासाठी मनपाने ५० लाख रुपये खर्चाच्या दोन निविदा प्रसिद्ध केलेल्या आहेत. मनपाकडे काम करणाऱ्या बहुतांश ठेकेदारांचे आधीचेच बिल न निघाल्याने पॅचिंगच्या कामासाठी कुणीच निविदा भरली नाही. त्यामुळे मनपाला आता पुन्हा फेरनिविदा काढाव्या लागणार आहेत.. शहरातील रस्त्यांच्या पॅचिंगसाठी दोन निविदा प्रसिद्ध केलेल्या आहेत काम मात्र, या कामांना ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही.