नवी दिल्ली : राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकन अर्ज सादर 15 संप्टेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून करण्यात आले आहे, या पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याची तारीख 31 ऑगस्ट पर्यंत होती, आता ती वाढवून 15 सप्टेंबर पर्यंत करण्यात आलेली आहे.
महिला आणि बाल विकास मंत्रालय दरवर्षी आपल्या मुलांची ऊर्जा, दृढनिर्धार, क्षमता, उमेद आणि उत्साहाचा गौरव करण्यासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिले जातात.
या पुरस्कारासाठी 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेले तसेच भारताचे नागरिकत्व आणि रहिवासी असलेले मुले, मुली अर्ज करु शकतात. या पुरस्कारांसाठी पात्र असणाऱ्या मुला-मुलींचे नामांकन केले जाऊ शकते.
दिनांक 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिवस या दिवशी पुरस्कार जाहीर केले जातील. राष्ट्रपतींकडून नवी दिल्ली येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात होणाऱ्या विशेष समारंभात विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले जातात. पुरस्काराचे स्वरुप पदक, रोख एक लाख रुपये बक्षीस, प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र असे आहे.