मुंबई – मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मागील दोन दिवसांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. मात्र संभाजीराजेंचं उपोषण मोडण्यात राज्य सरकारला यश आलं असून एका लहान मुलाच्या हातून रस घेऊन संभाजीराजेंनी हे उपोषण सोडलं आहे.
मराठा समाजाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याने हे उपोषण सोडत असल्याचं खासदार संभाजीराजेंनी सांगितलं. लेखी आश्वासनाशिवाय हे उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका खासदार संभाजीराजे यांनी मांडली होती. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारच्या वतीने त्यांची भेट घेतली.
दरम्यान मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य करत असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्यानंतर संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेतलं.