मुंबई – मागील दीड वर्षाहून अधिक काळ त्रस्त करून सोडलेल्या करोना व्हायरसने मागील काही दिवसांत भारताला आणि महाराष्ट्राला दिलासा दिला होता. अनेक अंदाज वर्तवून देखील करोनाची तिसरी लाट आली नाही. त्यामुळे चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आता पुन्हा एकदा करोना संसर्ग डोक वर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहे.
बाहेरच्या देशात अनेक ठिकाणी करोना संसर्गाची चौथी लाट आली आहे. तरी भारताने करोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखून धरल. मात्र दक्षिण आफ्रिकेत सापडलेला करोनाचा नवीन व्हेरियंट अत्यंत घातक असल्याचं बोलल जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र पाठवून सतर्कता बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार अलर्ट झालं आहे.
नवीन नियमावली
– सार्वजनिक वाहतूकीत लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच प्रवास करण्यास मुभा
– सभागृह, कार्यक्रम याठिकाणी लसीचे दोन डोस असलेल्यांनाच प्रवेश
– प्रवास करताना लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र असणं बंधनकारक
– महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना पूर्ण लसीकरण आवश्यक किंवा प्रवासाच्या ७२ तास आधीचा आरटी पीसीआर रिपोर्ट बंधनकारक
– सिनेमा हॉल, लग्नाचे हॉल, सभागृह याठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच प्रवेश
– दुकानात ग्राहकाने मास्क न घातल्यास दुकानदाराला १० हजार दंड, तर मॉल मालकाला ५० हजार दंड
– राजकीय सभा, कार्यक्रमात कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार दंड
– भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी केवळ २५ टक्के लोकांनाच उपस्थिती
– खासगी वाहनात मास्क न घातल्यास प्रवाशाला आणि वाहन मालकास प्रत्येकी ५०० रुपये दंड
सोशल डिस्टेंसिंगचं पालन करावं.
– सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई