मुंबई: लोकसभेची लढाई संपताच आता विधानसभेची लढाई सुरु झाली आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपली राजकीय मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दरम्यान, जागावाटपावरून भाजप आणि मित्रपक्षांमधे बिनसलं आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी शिवसेना-भाजपमध्ये ५०/५० चा फार्मुला ठरला आहे. यानुसार १४४/१४४ असा फॉर्म्युला ठरलेला होता. चंद्रकांत पाटील यांच्या विधानानं आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
चंद्रकांत पाटलांनी म्हटल्यानुसार शिवसेना–भाजप १३५-१३५ जागांवर लढतील. तर, मित्रपक्षांना १८ जागा देण्यात येणार असून त्यांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा भाजपचा प्लॅन आहे. मात्र मित्र पक्षांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास विरोध केला आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक १२२ जागा मिळाल्या. शिवसेनेस ६३, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या होत्या.
युतीसाठी फिप्टी-फिप्टीचा फॉर्म्युला निश्चीत – चंद्रकांत पाटील