मुंबई – बेळगाव महापालिका निवडणुकीचा नुकताच निकाल लागला. या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले, तर शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावं लागले. या निवडणुकीचा निकालावरून शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेत्यांमधील सुरू असलेली जुगलबंदी थांबण्याचा नाव घेत नाही. राऊत यांनी पुन्हा भाजपवर हल्लाबोल केलाय.
बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही. तर बेळगावात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झाला आहे, अशी टीका भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. “महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे..तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू. मराठी एकजुटीचा बेळगावात विजय झालाच पाहिजे असे बोलणे हा अहंकार की मराठी अस्मिता हे 11 कोटी मराठी जनतेलाच ठरवू द्या, असं राऊत यांनी ट्विट केलं.
महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे..तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू. मराठी एकजुटीचा बेळगावात विजय झालाच पाहिजे असे बोलणे हा अहंकार की मराठी अस्मिता हे 11 कोटी मराठी जनतेलाच ठरवू द्या..
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 8, 2021
‘बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपाचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात आमचा भगवा बेळगावर फडकला, मग एक करा. पालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा. महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणाऱ्या भाजपने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा!”, असं आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिले आहे.
बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपाचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात आमचा भगवा बेळगावर फडकला.मग एक करा.पालिकेच्या पहिलया सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा.महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणारया भाजपाने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा!
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 8, 2021