प्रभात प्रभाव
नगर – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु होवून तीन दिवस झाले असून नगर-पुणे महामार्गावरील स्टेट बॅंक चौकात अद्यापही भाजपची पोस्टर झळकत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आचारसंहिता भाजपच्या पथ्थावर आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आदर्श आचारसंहितेची ऐशी की तैसी केल्याचे वृत ऑनलाइन प्रभातमध्ये प्रसिद्ध होताच संबंधित विभागाने तातडीने फलक उतरविण्यात आले.
आचारसंहिता कालावधीत विना परवाना खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणुक चिन्हे लिहिणे, कापडी बॅनर अथवा फलक लावणे, झेंडे लावणे आधी कारणाने मालमत्ता विद्रुपित करण्यावर निवडणुक आयोगाने बंदी घातली आहे. अशा परिस्थीतीत राजकीय पक्ष वा उमेदवारांनी खासगी मालमत्ता विद्रुपित केली असेल तर त्यांनी तत्काळ पोस्टर्स, घोषणा, झेंडे, फ्लेक्स काढुन टाकण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. मात्र अद्यापही स्टेट बॅंक चौकात भाजपचे जनादेशयात्रेचे फलक राजरोसपणे लावल्याचे दिसत आहे.
आचारसंहितेत 90 टक्के साहित्य जप्त
आचारसंहितेत महापालिका प्रशासनाने शहरातील सार्वजनिक ठिकांची 90 टक्के प्रचार साहित्य जप्त केले आहे. यामध्ये 782 झेंडे, दोन होल्डिंग, 55 फलक काढले आहेत. निवडणुक काळात सार्वजनिक ठिकांनी शहर विद्रुप करण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे अतिक्रमन विभाग प्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितले.महानगरपालिकेच्या 1 हजार 970 कर्मचाऱ्यांपैकी 1 हजार कर्मचारी टप्या टप्याने नियुक्त केले जाणार आहे.