नवी दिल्ली – हाथरस, भदोही येथे नुकत्याच घडलेल्या बलात्काराच्या घटनांनी उत्तर प्रदेश हादरले आहे हे खरे; किंबहुना पूर्ण देशच हादरला आहे. यातच माध्यमांना राजकीय नेत्यांना हाथरस घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट न घेऊ दिल्यामुळे देशासह राज्यात तीव्र पडसाद उमटत होते यामुळे उत्तरप्रदेशातील भाजप सरकारवर जोरदार टीका देशभरातून करण्यात येत असतानाच भाजपा नेत्यानं मुलीचीच चुक असल्याचं सांगत चांगलीच मुक्तफळं उधळली.
He is not fit to be called leader of any party. He is showing his primitive and sick mindset and I am going to send notice to him. https://t.co/TyWigJwXWM
— Rekha Sharma (@sharmarekha) October 6, 2020
उत्तर प्रदेशातील बाराबांकी जिल्ह्यातील भाजपाचे नेते रणजीत बहादूर श्रीवास्तव यांनी हाथरस प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, ‘मुलीनं मुलाला बाजरीच्या शेतात बोलावलं असेल, कारण प्रेमप्रसंग होता. मुलीला पकडलं गेलं असेल. शेतामध्ये असंच होतं. ज्या मुली अशा प्रकारे मरतात, त्या काही मोजक्या ठिकाणीच सापडतात. या ऊसाच्या शेतात सापडतात, तुरीच्या शेतात सापडतात, बाजरीच्या शेतात, या नाल्यामध्ये सापडतात, झाडाझुडपांमध्ये सापडतात, जंगलात सापडतात, या तांदुळाच्या शेतात का सापडत नाहीत? या गव्हाच्या शेतात मेलेल्या का सापडत नाहीत? यांची मरण्याची जागा तीच आहे.
ते पुढे म्हणाले, कुठेही ओढून नेल्या जात नाहीत. यांना ओढून नेताना कुणी पाहत नाही. मग या घटना यांच्या सोबत का घडतात? हे देशपातळीवर माहिती आहे, मी काहीही चुकीचं बोललो नाही. पण मुलगी दोषी नाही, मुलं दोषी आहेत,” असं वादग्रस्त भाष्य श्रीवास्तव यांनी केलं आहे.
तत्पूर्वी, सुरेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशमधील बलिया विधानसभा मतदसंघातील आमदार असून त्यांनी हाथरस प्रकरणावर मुक्तफळं उधळली होती. भाजप पक्षातील नेत्यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत.