मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार जाऊन राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. तेव्हापासून ठाकरे गट आणि भाजप सह शिंदे गट यांच्यामध्ये सतत कुरघोड्यांचे राजकारण सुरु असते. नुकतच उद्धव ठाकरेंनी भाजपसह शिंदे गटाला डिवचत एक विधान केलं. “शिवसेनाप्रमुखांनी जी सेना स्थापन केली ती भाजपची पालखी वाहून नेण्यासाठी नाही. हिंदुत्वाची पालखी वाहून नेण्यासाठी केली आहे” असं ठाकरे म्हणाले होते. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरेंच्या या विधानाचा समाचार घेत टीका केली आहे.
भाजपचे अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता, त्यावर आता अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये भातखळकर म्हणतात,”नाव बाळासाहेबांचे,डोहाळे फक्त सत्तेचे ! पालखीचे भोई पवारांचे जळो जिणे लाचारांचे” अशी खोचक टीका भातखळकर यांनी केली आहे.
https://www.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/01/Atul-bhatkhalkar.jpeg
https://www.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/01/Atul-bhatkhalkar.jpeg
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे नेमकं
शिवसेनाप्रमुखांनी जी शिवसेना स्थापन केली ती भाजपची पालखी वाहून नेण्यासाठी नाही. हिंदुत्त्वाची पालखी वाहण्यासाठी केली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसेच विरोधकांनी साथ सोडली नसून आपल्याच मित्र पक्षाने साथ सोडल्याच्या भावना यावेळी ठाकरेंनी व्यक्त केल्या होत्या. तसेच भाजप सोडून पक्षात आलेल्या अद्वय हिरे यांनी उद्देशून ठाकरे म्हणाले होते बरं झालं गद्दार गेले त्यामुळे हिरे आम्हाला मिळाले.