मालदा (पश्चिम बंगाल) – भाजप स्वतःच्या हितासाठी हिंदू धर्माची बदनामी करत आहे. तसेच भाजपने हिंदू धर्मातील अध्यात्म नष्ट केले असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
तृणमूल कॉंग्रेसच्या एका मोहिमेदरम्यान भाषण करताना ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपला जितक्या लवकर सत्तेतून बाहेर काढले जाईल तितके देशासाठी चांगले होईल, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, कर्नाटक विधानसभा निवडणूक 10 मे रोजी होत असून या निवडणुकीपासून भाजपच्या पतनाची सुरुवात होईल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही पक्षाला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, जंतर-मंतर येथे दिल्ली पोलीस आणि कुस्तीपटू यांच्यातील हाणामारीबद्दल त्यांनी केंद्रावर निशाणा साधला.