हुबळी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने देशातील सर्व घटनात्मक संस्थावर स्वताचे वर्चस्व निर्माण करून त्यावर ताबा मिळवला असल्याचा जो आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे त्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते व संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.
त्यांनी म्हटले आहे की जेव्हा जेव्हा कॉंग्रेसचा पराभव होतो त्यावेळी ते अशा प्रकारचा आरोप करीत असतात त्यांच्या आरोपांना कोणीही गांभीर्याने घेण्याची गरज नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
प्रल्हाद जोशीम उपस्थितांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही सर्वजण राहुल गांधींना गांभीर्याने का घेत आहात, सर्व संस्था चांगल्या प्रकारे काम करत आहेत, नाही तर आम्ही हिमाचल प्रदेशात कसे गमावले असते असा सवाल त्यांनी केला. जेव्हा जेव्हा कॉंग्रेसचा पराभव होतो तेव्हा ते निवडणूक आयोगाला दोष देतात. ते म्हणाले की संस्थांवर कब्जा करणे ही कॉंग्रेसची संस्कृती आहे.