‘Bharat Ratna’: कृषी क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणारे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार आहे याविषयी माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थोड्यावेळापूर्वी त्यांच्या ट्विटरवर लागोपाठ ३ ट्विट करत भारतरत्न पुरस्काराची माहिती दिली. यात त्यांनी सुरुवातीला कृषी क्षेत्रांत अभूतपूर्व योगदान देणारे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना देण्यात येणाऱ्या भारतरत्न पुरस्काराविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी ” देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे हे आपल्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत वा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. त्यांचे आमच्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती असलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे.” असे म्हटलं आहे.
पुढे त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्यविषयी बोलताना,”आपले माजी पंतप्रधान श्री पीव्ही नरसिंह राव गरू यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे हे सांगताना आनंद होत आहे. एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून, नरसिंह राव गरू यांनी विविध पदांवर भारताची मोठ्या प्रमाणावर सेवा केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, तसेच अनेक वर्षे संसद व विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कार्यासाठी ते तितकेच स्मरणात आहेत. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनविण्यात, देशाच्या समृद्धी आणि विकासासाठी भक्कम पाया घालण्यात महत्त्वपूर्ण ठरले.” असे त्यांनी म्हटले आहे.
हमारी सरकार का यह सौभाग्य है कि देश के पूर्व प्रधानमंत्री चौधरी चरण सिंह जी को भारत रत्न से सम्मानित किया जा रहा है। यह सम्मान देश के लिए उनके अतुलनीय योगदान को समर्पित है। उन्होंने किसानों के अधिकार और उनके कल्याण के लिए अपना पूरा जीवन समर्पित कर दिया था। उत्तर प्रदेश के… pic.twitter.com/gB5LhaRkIv
— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2024
नरसिंह राव गरू यांचा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ महत्त्वपूर्ण उपाययोजनांद्वारे चिन्हांकित होता ज्याने भारताला जागतिक बाजारपेठांसाठी खुले केले आणि आर्थिक विकासाच्या नवीन युगाला चालना दिली. शिवाय, भारताचे परराष्ट्र धोरण, भाषा आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान एक नेता म्हणून त्यांचा बहुआयामी वारसा अधोरेखित करते ज्याने भारताला केवळ गंभीर परिवर्तनांद्वारे चालविले नाही तर त्याचा सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा देखील समृद्ध केला.” असे म्हणून त्यांनी त्यांच्या कार्यांचा गौरव केला आहे.
Delighted to share that our former Prime Minister, Shri PV Narasimha Rao Garu, will be honoured with the Bharat Ratna.
As a distinguished scholar and statesman, Narasimha Rao Garu served India extensively in various capacities. He is equally remembered for the work he did as… pic.twitter.com/lihdk2BzDU
— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2024
त्यानंतर पुढच्या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी “भारत सरकार डॉ. एमएस स्वामीनाथन जी यांना आपल्या देशासाठी कृषी आणि शेतकरी कल्याणात दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना भारतरत्न प्रदान करत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आव्हानात्मक काळात भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी मदत करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले. एक नवोदित आणि मार्गदर्शक आणि अनेक विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण, संशोधनाला प्रोत्साहन देणारे त्यांचे अमूल्य कार्य आम्ही ओळखतो. डॉ. स्वामीनाथन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने केवळ भारतीय शेतीचाच कायापालट केला नाही तर देशाची अन्न सुरक्षा आणि समृद्धीही सुनिश्चित केली आहे. तो मला जवळून ओळखत असे आणि मी नेहमी त्याच्या अंतर्दृष्टी आणि इनपुटची कदर केली.” असे म्हणत त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
It is a matter of immense joy that the Government of India is conferring the Bharat Ratna on Dr. MS Swaminathan Ji, in recognition of his monumental contributions to our nation in agriculture and farmers’ welfare. He played a pivotal role in helping India achieve self-reliance in… pic.twitter.com/OyxFxPeQjZ
— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2024
दरम्यान, या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या शनिवारी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारत सरकारतर्फे देशाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती.