मंचर -आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील भोकरशेत येथे जाणाऱ्या रस्त्याची पावसाच्या पाण्यामुळे वाट लागली आहे. शेतकऱ्यांना शेतीमाल व दूध वाहतूक करताना कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
भोकरशेत या ठिकाणी जाण्यासाठी चौरे येलभर मळ्यातून रस्ता जात आहे. रस्त्याचे निम्मे डांबरीकरण झाले असून उर्वरित रस्ता कच्चा आहे. पावसाच्या पाण्यामुळे रस्ता वाहून गेला आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
शेतकऱ्यांना गुडघाभर पाण्यामध्ये वाहतूक करावी लागत आहे. रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्या कोमल हिंगे, श्रीहरी हिंगे यांनी केली आहे.