त्यांच्या एका वक्तव्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे ज्यात एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणत आहे,’पंजाबचा शेतकरी दिल्लीत नाही तर लाहोरला जाईल का? सरकार त्यांना का रोखत आहे?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला या दरम्यानचा व्हिडिओ सध्या सोशल तुफान व्हायरल होत आहे.
bhagwant mann । काय म्हणाले भगवंत मान?
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत म्हणाले,’पंजाबच्या शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यास काही निर्बंध आहे का? दिल्ली ही त्यांची राजधानी नाही का? दिल्लीतून सरकार चालते तेव्हा शेतकऱ्यांनी जायचे कुठे?शेतकऱ्यांनी लाहोरला जायचे का?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
भगवंत मान पुढे म्हणाले, “बरं, शेतकरी लवकर लाहोरला जाऊ शकला असता, सरकारने इथे लावलेल्या मोठ्या तारा लाहोरपेक्षा कमी आहेत. शेतकऱ्यांना का येऊ दिले जात नाही? त्याला इथे राम लीला मैदानावरही बसवता आले असते, इथे चर्चा होऊ शकली असती.’ असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.