मुंबई – मागील १६ दिवसांपासून सुरु असलेले सत्ता नाट्य अद्यापही जैसे थे असल्याचे चित्र आहे. भाजपने देखील आपण सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे जाहीर केले आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे सत्तासंघर्षाला नाट्यमय वळण लागले आहे. त्यामुळे शिवसेना सरकार स्थापन करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला असून शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अशातच काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मध्यावधी निवडणूक होण्याचे संकेत दिले आहेत.
संजय निरुपम म्हणाले कि, कोण सत्ता स्थापन करत आहेत याचा काही फरक पडत नाही. परंतु, महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे हे नक्की. यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार व्हा. २०२० मध्ये निवडणूक होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. आम्हाला शिवसेनेसोबत जायला पाहिजे का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
No matter who forms govt and how ? But the political instability in Maharashtra can not be ruled out now. Get ready for early elections. It may take place in 2020.
Can we go to the elections with ShivSena as partner ?— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) November 11, 2019
दरम्यान, संजय निरुपम यांनी रविवारी शिवसेनेसोबत होणाऱ्या आघाडीवर प्रशचिन्ह उपस्थित केले होते. ते म्हणाले कि, कॉंग्रेस-राष्ट्रवादीला कदाचित शिवसेनेचा पाठिंबा घ्यावा लागेल, परंतु, हे विनाशकारी पाऊल ठरेल आणि हे कधीही होऊ नये.
In the current political arithmetic in Maharashtra, its just impossible for Congress-NCP to form any govt. For that we need ShivSena. And we must not think of sharing power with ShivSena under any circumstances.
That will be a disastrous move for the party.#MaharashtraCrisis— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) November 10, 2019