नवी दिल्ली – रविवारी 23 एप्रिल रोजी एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा सामना रंगला. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 7 धावांनी राजस्थान रॉयल्स वर विजय मिळवला. परंतु आता बीसीसीआयने या सामन्यातील एका चुकीमुळे आरसीबीचा विराट कोहली आणि संघातील इतर खेळाडूंना दंड ठोठावला आहे.
म्हणून ठोठावला तब्बल 24 लाखांचा दंड
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळाडू विराट कोहली याला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार म्हणून नियुक्त केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने संथ गतीने गोलंदाजी केल्याने स्लो ओव्हर रेट प्राप्त झाल्याचे बीसीसीआय च्या निदर्शनात आले. याच कारणास्तव बीसीसीआयने विराटला 24 लाखांचा दंड तर संघातील इतर खेळाडूंना 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25 टक्के, असा दंड ठोठावण्यात आला आहे.
दरम्यान, सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या हंगामातील आरसीबीची हि दुसरी चूक आहे. ज्यामुळे कर्णधारासह प्लेइंग इलेव्हनमधील सर्व सहकारी खेळाडू आणि प्रभावशाली खेळाडूंना दंड ठोठावण्यात आला आहे. आरसीबीने हा सामना 7 धावांच्या फरकाने जिंकला होता.