ख्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आजपासून (शनिवार) सुरू होत आहे. पहिला सामना न्यूझीलंडने १० विकेटनी जिंकला होता. त्यामुळे भारताला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी दुसरा सामना जिंकणे आवश्यक आहे.
Spot the pitch 🤔🤔#NZvIND pic.twitter.com/gCbyBKsgk9
— BCCI (@BCCI) February 27, 2020
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या सामन्यांच्या मैदानावरील खेळपट्टीच्या तयारीचा फोटो व्हायरल केला असून संपूर्ण मैदानावर हिरवळ पसरलेली असून खेळपट्टी शोधा अशा शब्दांत खोचक प्रश्न केला आहे. मैदानावरील हिरवळ इतकी दाट आहे की खेळपट्टी नक्की कुठे आहे हेच समजत नाही.
या सामन्याव्दारे मालिका जिंकण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न असून पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाज वेगवान गोलंदाजीसमोर अपयशी ठरले होते. हेच लक्षात घेत याही सामन्याची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पोषक असावी यासाठी खेळपट्टीवर गवत ठेवले जाणार हेच दिसून येत आहे.