वेलिंग्टन : नवोदित सलामीवीर तसेच मधली फळी आणि कर्णधार विराट कोहली यांच्या अपयशाने न्यूझीलंडविरूध्दच्या पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना करावा करावा लागलेल्या भारतीय संघात दुस-या सामन्यासाठी मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे.
पहिल्या सामन्यात पराभव झाल्याने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याच्या भारताच्या स्वप्नांना धोका निर्माण झाला आहे. सलामीवीर पृथ्वी शाॅ आणि मयांक अग्रवाल यांना चांगली सलामी देण्यात अपयश आले होते.
चेतेश्वर पुजारा, कर्णधार कोहली, हनुमा विहारी आणि रिषभ पंत यांनीही निराशा केली. सलामीची जोडी तसेच मधली फळी अपयशी ठरल्याने कोहलीवरचा दबाब वाढला. त्याला देखील फलंदाजीत आलेले अपयश संघासाठी खूपच महागात पडले.
दुसरा कसोटी सामना ख्राइस्टचर्च येथे उद्यापासून (शनिवार) सुरू होत आहे. त्यासाठी संघात काही बदल होणार यांचे संकेत मिळाले आहेत. पृथ्वी शाॅ एवजी शुभमन गिल आणि रिषभ पंत ऐवजी वृध्दिमान शहा याला संधी मिळू शकते.