उस्मानाबाद – उस्मानाबादमधील बळीराजाच्या लढ्याला यश आले असून तब्बल साडेतीन लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 2020साली अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पण तरीही शेतकऱ्यांना पीकविमा कंपन्यांकडून मदत मिळाली नाही.
याविरोधात शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. औरंगाबाद खंडपीठानेही शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्या निकालाविरोधात विमा कंपनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. य प्रकरणी न्यायालयाने आज निकाल देत शेतकऱ्यांना तीन आठवड्याच्या आत विम्याचे पैसे देण्याचे आदेश दिले आहेत.
या विरोधात शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. औरंगाबाद खंडपीठानेही शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला होता. विमा कंपनी या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेली होती. सुप्रीम कोर्टाने आज आपला निकाल देताना विमा कंपनीला शेतकऱ्यांचे तीन आठवड्याच्या आत विम्याचे पैसे देण्याच्या आदेश दिले आहेत.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील 3 लाख 57 हजार 287 शेतकऱ्यांना 510 कोटी रुपयाचा विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयानंतर राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याने मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. या शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले.