जिल्ह्यात यंदा 139 टक्के पाऊस झाल्याने आणि मातीत ओल कायम असल्याने सध्या पिकांची परिस्थिती उत्तम आहे. आणि रब्बीच्या गहू आणि हरभरा पिकांची पेरणी प्रगती पथावर असल्याचे चित्र सध्या पहायला मिऴत आहे. सध्या ज्वारीपिकाची 50 टक्के तर गहूपिकाची 31 टक्के पेरणी झाली आहे. उशिरा झालेल्या पावसाने पिकाची परीस्थिती समाधानकारक असून अल्प प्रमाणात पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने त्यावर उपाय योजना सुरू आहे.
भुईमुगाची पेरणी सरासरी 128.93 टक्के झाली आहे. पीक शेंगा पक्व होण्याच्या अवस्थेत असून पीक परिस्थिती समाधानकारक आहे. तर कापसाची सरासरी 123.72 टक्के पेरणी झाली आहे. पीक सध्या पक्वतेच्या अवस्थेत असून काही ठिकाणी दहियाचा प्रादुर्भाव दिसून आला असून शेतकरी फवारणी करीत आहेत.
कापूस पिकावर अमेरिकन लष्करी अळींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सततच्या पावसामुळे काही क्षेत्रावरीलपिकांचे नुकसान झाले आहे. रब्बी ज्वारीची पेरणी अंतिम टप्प्यात असून एकूण 2लाख 35 हजार 645 हेक्टर जमिनीवर पेरणी झाली आहे. अमेरिकन लष्करी अऴीचा प्रादुर्भाव दिसून येत असून कीड नियंत्रणाच्या उपाय योजना चालू आहे. पीक परीस्थिती समाधान कारक असून काही ठिकाणी पीक पोटरी अवस्थेत आहे.
जिल्ह्यात रब्बीची 62 टक्के पेरणी
सध्या जिल्ह्यात एकूण रब्बी तृण धान्याची 47 टक्के तर एकूण कडधान्याची 28 टक्के, तर एकूण अन्नधान्य 44 टक्के आणि रब्बी गळीत धान्य 4 टक्के अशी एकूण रब्बी हंगामातील 44 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. तर ऊस लागवडही 18 टक्के झाली असून अशी एकूण आतापर्यंत रब्बी हंगामातील 62 टक्के पेरणी झाली आहे.