Ayodhya – विजयादशमीच्या मुहूर्तावर अयोध्येत सनातन धर्माच्या विरोधकांची पोस्टर्स जाळण्यात आली. जगतगुरु परमहंसाचार्य यांनी सनातन धर्मावर भाष्य करणाऱ्या राजकारण्यांची पोस्टर्स जाळली. अशा नेत्यांचे वर्णन त्यांनी कलियुगातील रावण असे केले आहे. ते म्हणाले की, ज्या प्रकारे रामजींनी रावणाचा वध केला होता. त्याचप्रमाणे सनातन धर्माला विरोध करणाऱ्यांना मी एक एक करून जीवे मारणार आहे. त्यांच्या या विधानावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे.
जगतगुरु परमहंसाचार्य द्रमुक नेते हे उदयनिधी स्टॅलिन, बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर, यूपीचे सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पुत्र प्रियांक खर्गे यांच्या सह विरोधी पक्षातीतलं नेत्यांना कलियुगी रावण विरोधी मानतात. जगतगुरु परमहंसाचार्य यांनी प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी डीजीपी यूपी यांना केलेल्या ट्विटवर ट्विट केली आहे की,’त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना हाकलून दिले होते, आता ते रामकथेच्या नावावर रावण कथा सांगत आहेत, म्हणून ‘कुमार विश्वास योग्य नाहीत.’
ते म्हणाले की, द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन, बिहारचे शिक्षणमंत्री स्वामी प्रसाद मौर्य, प्रियांक खरगे, काही लोक सनातन धर्माला डेंग्यू, डास मलेरिया म्हणत आहेत, कोणी त्याला एचआयव्ही म्हणत आहेत, कोणी कोविड म्हणत आहेत आणि कोणी संपवण्याची धमकी देत आहेत. कोणी आमच्या रामचरितमानसला द्वेष पसरवणारा ग्रंथ म्हणत आहे. आज आपण या राक्षसांचे पुतळे जाळले आहेत.
जगतगुरु परमहंस आचार्य म्हणाले, ‘सनातन धर्म संपवण्याची धमकी देणाऱ्या लोकांपासून मी देशवासियांना दूर राहण्याचे आवाहन करतो. स्वामी प्रसाद मौर्य यांच्याबाबत हे समजून घेण्याचा आम्ही अनेकदा प्रयत्न केला, पण त्यात वाढ होत आहे. सनानातन धर्माविरोध बोलणाऱ्या नेत्यांना गोळ्या घालणाऱ्यास आम्ही २५ कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. मी त्याला 25 कोटी रुपये देईन आणि आर्थिक मदतही देईन आणि जो कोणी सनातन धर्माला विरोध करेल त्याला सोडणार नाही.’ त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वातावरण तापले आहे.