मोहाली :- ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल झाला असून यजमान भारतासह तीन टी-20 सामन्यांची मालिका आजपासून येथे होत असलेल्या पहिल्या सामन्याने सुरू होत आहे. आशिया करंडक स्पर्धेत झालेल्या चुका दुरुस्त करत या मालिकेत सरस खेळ करण्याची संधी भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंसह नवोदितांनाही मिळणार आहे.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आहे. (Australia have elected to bowl against #TeamIndia in the first #INDvAUS T20I) ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याने नाणेफेक(टाॅस) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
🚨 Toss Update 🚨
Australia have elected to bowl against #TeamIndia in the first #INDvAUS T20I.
Follow the match 👉 https://t.co/ZYG17eC71l pic.twitter.com/jxRYDRl9Bk
— BCCI (@BCCI) September 20, 2022
टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत आघाडी घेण्याची इच्छा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 23 टी-20 सामने झाले आहेत. यापैकी भारताने 13 तर ऑस्ट्रेलियाने 9 सामने जिंकले आहेत. एक सामना निकालाविना संपला. भारतात खेळताना ऑस्ट्रेलियाने 3 सामने जिंकले आहेत आणि 4 गमावले आहेत.