नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये एटीएसकडून अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. एटीएसने पुन्हा एकदा गुजरातमधील कच्छमधून एका पाकिस्तानी बोटीतून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केल्याची महत्वाची माहिती समोर येत आहे.
बीएसएफच्या मदतीने एटीएसने ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंब्रा बंदरातून ५०० किलोंचे कोकेन जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता तब्बल २५० कोटी रुपयांचे ५० किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. पाकिस्तानी बोटीतून हा हेरॉईनचा साठा भारतात आणला जात असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानंतर एटीएसने बीएसएफच्या मदतीने ही कारवाई केली आहे.
गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी या कारवाई विषयी माहिती देताना ,”अरबी सुमुद्रात एका बोटीतून अंमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. संशयित बोटीचा आम्ही पाठलाग केला आणि बोट जप्त केली तेव्हा त्यात ५० किलो हेरॉईन आढळून आले. पाकिस्तानची ही बोट असून या बोटीला ताब्यात घेण्यात आले आहे. अंतराष्ट्रीय बाजारात या हरॉईनची किंमत २५० कोटी रुपये आहे. असे म्हटले आहे.
छत्तीसगडच्या दुर्ग पोलिसांनी अंमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या चार तस्करांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 207 पाकिटे ब्राऊन शुगर आणि 223 नग नेट्राझेपाम या नशेच्या गोळ्या जप्त केल्या. यांची किंमत लाखो रुपये आहे.
दुर्ग पोलिसांची अंमली पदार्थ विक्रेत्यांवर करडी नजर असते. याच दरम्यान, कारागृहातून सुटलेले पूर्वीचे अंमली पदार्थ विक्रेते बबलू यादव आणि लकी महार यांनी मोठ्या प्रमाणात ब्राऊन शुगरचा साठा आपल्याजवळ ठेवला होता. ग्रीन चौक कुंडारापाराजवळ काही लोक अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.