मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या रविवारी झालेल्या लढतीत बीसीसीआय व आयपीएल समितीसह ब्रेबॉन स्टेडियमवर उपस्थित राहिलेल्या चाहत्यांना मोठ्या किंमतीची तिकिटे घेऊनही मनस्ताप झाला. तीन हजार रुपये किंमतीची तिकिटे घेतलेल्या प्रेक्षकांना चक्क प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसवण्यात आले.
मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना झाला. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळाची म्हणजेच बीसीसीआयची तशीच श्रीमंत टी-20 लीग अशी ओळख असलेली स्पर्धा पाहण्यासाठी दोन वर्षांनंतर अखेर मर्यादित प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला होता. पण प्रेक्षकांना बसण्यासाठी ब्रेबॉन स्टेडियमवरील व्यवस्थाही अगदीच हलक्या दर्जाची होती.
ज्या प्रेक्षकांनी एका तिकीटासाठी तीन ते साडे तीन हजार रुपये खर्च केले त्यांना प्लॅस्टिकच्या खुर्च्यीत बसवण्यात आल्याचे पाहायला मिळाले. प्रेक्षकांनी यावर संताप व्यक्त करत सोशल मीडियावर हा अनुभव व्यक्त केला व आयोजकांवर टीकाही केली आहे. या स्टेडियमची 20 हजार प्रेक्षक क्षमता आहे. आता पुढील सामन्यांत काय परिस्थिती दिसते याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.