नवी दिल्ली : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. भाजपनं पहिल्या दोन तासांच्या कलांमध्ये बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपला 222 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्याचबरोबर समाजवादी पक्षाची आघाडीही निवडणुकांमध्ये ‘काँटे की टक्कर’ देत आहेत. याच ‘काँटे की टक्कर’वर राज्यातील भाजपचे नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत.
भाजपा नेते गिरीश महाजन यांनी उत्तर प्रदेशच्या सुरुवातीच्या कलांवर आपली प्रतिक्रिया देताना,”उत्तर प्रदेश ‘झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है” म्हणले आहेत. तसेच ठाकरे सरकारला इशारादेखील त्यांनी यावेळी दिला आहे. एवढेच नाही तर त्यांनी सर्व एग्झिट पोल फेल ठरतील असेही म्हटले आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. आज दुपारपर्यंत सर्वच राज्यातील निकालांचा कल स्पष्ट होईल. त्यामुळे कोणता पक्ष कोणत्या राज्यात सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्वाचं ठरेल.