हांगझोऊ – आशियाई क्रीडा स्पर्धेत गुरुवारचा दिवसही भारतीय खेळाडूंसाठी संमिश्र स्वरूपाचा ठरला. पुरुष व महिलांच्या सांघिक तिरंदाजीच्या कंपाउंड प्रकारात भारतीय पुरुष व महिला संघाने सुवर्णपदकाचा वेध घेतला.
महिला संघाने अंतिम फेरीत तैवानचा 230-228 असा अवघ्या दोन गुणांनी पराभव केला. भारताच्या सुवर्णपदक विजेत्या संघात अदिती गोपीचंद स्वामी, ज्योती सुरेखा व प्रनित कौर यांनी हे यश देशाला मिळवून दिले. हे भारताचे या स्पर्धेतील 19 वे सुवर्णपदक ठरले.
🎯🥇GOLDEN GIRLS🥇🎯#KheloIndiaAthletes Aditi, @VJSurekha, and @Parrneettt add another Gold to India’s medal tally after defeating Chinese Taipei by a scoreline of 230-229🤩🎯
What a thrilling final 💪 Our Indian Archery contingent is truly shining bright, clinching their 2nd… pic.twitter.com/NtTiqO37aY
— SAI Media (@Media_SAI) October 5, 2023
पुरुष संघाचीही मक्तेदारी…
भारताच्या पुरुष तिरंदाजांनी देखील महिलांच्या बरोबरीने अफलातून कामगिरी करताना सांघिक कंपाउंड गटात सुवर्णपदकाचा वेध घेतला. अभिषेक वर्मा, ओजस देवताळे व प्रथमेश जावकर यांनी दक्षिण कोरियावर 235-230 अशी मात केली व सुवर्णपदकावर नाव कोरले. भारताचे हे आजचे तिसरे सुवर्ण ठरले.
🥇HATTRICK FOR THE DAY🥇
🇮🇳’s Compound Archers @archer_abhishek, and #KheloIndiaAthletes Ojas, and Prathamesh clinch the coveted GOLD, defeating Korea by a score of 235-230 at the #AsianGames2022 🏹🥇
With this victory, India makes a hattrick, marking the 3️⃣rd gold medal of… pic.twitter.com/OjPwSfYbGS
— SAI Media (@Media_SAI) October 5, 2023
दरम्यान, भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केली असून आजपर्यत स्पर्धेच्या बाराव्या दिवसअखेर एकूण 86 पदके जिंकण्यात यश मिळविले आहे. आतापर्यंत भारताने 21 सुवर्ण, 32 रौप्य आणि 33 कांस्य पदके जिंकली आहेत.