India vs Bangladesh Asia Cup 2023 Super4 :आशिया चषक 2023 च्या शेवटच्या सुपर फोर सामन्यात भारताला बांगलादेशविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या सुरू असलेल्या आशिया चषकात भारताचा हा पहिलाच पराभव आहे.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत 265 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा डाव 259 धावांवर आटोपला आणि सहा धावांनी सामना गमावला.
या आशिया चषकात भारताचा हा पहिलाच पराभव आहे. तथापि, स्पर्धेच्या दृष्टिकोनातून या सामन्याचे महत्त्व नव्हते आणि टीम इंडिया 17 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. त्याचवेळी या विजयासह बांगलादेशचा या स्पर्धेतील प्रवास संपला.
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 ओव्हर्समध्ये आठ गडी गमावून 265 धावा केल्या होत्या. कर्णधार शकीब अल हसनने सर्वाधिक 80 धावांचे योगदान दिले. तौहीद हृदयॉयने 54 आणि नसूम अहमदने 44 धावा केल्या. भारताकडून शार्दुल ठाकूरने तीन आणि मोहम्मद शमीने दोन बळी घेतले. प्रसिध, अक्षर आणि जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
266 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 49.5 ओव्हर्समध्ये 10 गडी गमावून 259 धावाच करू शकला. शुभमन गिलने 121 धावांची शानदार खेळी केली, पण त्याला कोणाचीही साथ मिळाली नाही. 42 धावा करणारा अक्षर दुसरा सर्वोत्तम धावा करणारा ठरला. बांगलादेशकडून मुस्तफिजुर रहमानने तीन बळी घेतले. महेदी हसन आणि तनझिम हसन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शाकिब आणि मेहदीने प्रत्येकी एक विकेट घेतली.