कोलंबो :- भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज व अष्टपैलू रवींद्र जडेजा याने येथे सुरू असलेल्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत एका अनोख्या कामगिरीला गवसणी घातली आहे. त्याने या स्पर्धेच्या इतिहासात भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनण्याचा मान मिळवला आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या सुपर फोर गटातील सामन्यात त्याने एक गडी बाद केला व ही कामगिरी आपल्या नावावर केली. यापूर्वी ही कामगिरी इरफान पठाणच्या नावावर होती. त्याने 22 बळी घतले आहेत. जडेजाच्या नावावर आता 24 बळींची नोंद झाली आहे. पठाणनंतर कुलदीप यादवने 17, सचिन तेंडुलकरनेदेखील 17 तर कपिल देव यांनी 15 बळी घेतले आहेत.
दरम्यान, आज बांगलादेशविरूध्दच्या सामन्यात देखील रवींद्र जडेजाने 10 ओव्हर्समध्ये 53 धावा देताना 1 गडी बाद केला.यासह त्याने या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमधील 200 बळीही पूर्ण केले.