रांची – इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्मा व रवींद्र जडेजा यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती पाहूनच मला प्रेरणा मिळाली व मी दुसऱ्या डावात मोठी खेळी करु शकलो, असे मत यशस्वी जयस्वालने मांडले आहे.
ज्यावेळी पहिल्या डावात रोहित आणि जडेजाची फलंदाजी पाहात होतो तेव्हा मी प्रेरणा घेतली आणि तशा पद्धतीने दुसऱ्या डावात खेळ केला. डग आऊटमध्ये बसलो होतो तेव्हाच मी कसोटी क्रिकेटसाठी 100 टक्के योगदान देणार हे निश्चित केले होते. जेव्हा-जेव्हा मला कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळते तेव्हा माझे लक्ष्य सर्वोत्तम कामगिरी करण्याचे असते. चांगल्या फॉर्मचा फायदा घेणे आणि त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करणे महत्त्वाचे आहे, असेही तो म्हणाला.
रोहित आणि जडेजा यांना खेळताना पाहून प्रेरणा घेतली. तिसऱ्या कसोटीमध्ये रोहित शर्माने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पहिले तीन बळी लवकर गेले. त्यावेळी संघाची धावसंख्या 3 बाद 33 अशी झाली होती, तेव्हा संघ व्यवस्थापनाने जडेजाला पाच नंबरला खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी रोहित आणि जडेजा यांनी मोठी भागीदारी केली. त्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या कमाल कामगिरीच्या जोरावरच आम्ही इंग्लंडला बॅकफूटला ढकलले, असही तो म्हणाला.
BCCI & Team India : ..तर गंभीर परिणाम होतील, बीसीसीआय सचिव जय शहा यांचा खेळाडूंना इशारा….
भारतीय संघाने तिसरा कसोटी सामना चौथ्याच दिवशी खिशात घातला. भारतान इंग्लंड संघाला 434 धावांनी पराभूत करत कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय मिळवला. या विजयामध्ये यशस्वी जयस्वाल याने नाबाद 214 धावांची खेळी केली. रवींद्र जडेजा याला सामनावीर पुरस्कार देत गौरवण्यात आल. सामना संपल्यावर द्विशतकवीर यशस्वीने दोन खेळडूंची नाव घेत त्यांना पाहून आपण प्रेरणा घेतल्याचं सांगितले.