सातारा – करोनाचा फैलाव रोखण्यासाठी 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन सुरू असल्याने नागरिकांना घरात बसावे लागले आहे. घरात बसून आलेला कंटाळा घालविण्यासाठी साताऱ्यातील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयतर्फे सर्वांसाठी खुली ऑनलाइन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती ग्रंथालयाचे संस्थापक डॉ. रवींद्र भारती-झुटिंग व अध्यक्ष शशिभूषण जाधव यांनी दिली.
या स्पर्धेत करोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर “मज मी सापडलो’, “करोनानंतरचे जग’ व “समाजशिस्त आणि मी’ हे विषय असून निबंध मराठी भाषेत एक हजार ते पंधराशे शब्दांचा असावा. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी 2100 रुपये, द्वितीय 1500 रुपये, तृतीय 1000 रुपये, चतुर्थ 750 रुपये व पाचवा 500 रुपये, अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी आपले निबंध पीडीएफ अथवा इमेज फाइलच्या स्वरूपात अथवा 7517411999 या व्हॉटस्ऍप क्रमांकावर बुधवार, दि. 15 एप्रिलपर्यंत पाठवावेत.