Ashok Chavan । काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या नांदेडमधील चव्हाण घराण्यातील अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेस पक्षचा राजीनामा दिला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडववर त्यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे. त्यांच्या राजीनामा पूर्वी मुंबईतील मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकी हे दोन स्थानिक काँग्रेस नेतेही काँग्रेसची साथ सोडून गेले.
अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडणे हा मात्र एक मोठा धक्का आहे. कालपर्यंत अशोकराव काँग्रेसच्या लोेकसभा निवडणुकीच्या तयारीच्या बैठकांना हजर राहात होते. अगदी कालच मुंबईत महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी महत्त्वाच्या नेत्यांची जी बैठक घेतली होती, त्यांच्या शेजारच्या खुर्चीत अशोकराव बसले होते. आणि आज अचानक त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
दरम्यान, अशोक चव्हाण हे आज भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहे. अशोक चव्हाण यांनी भाजप पक्षात प्रवेश केला तर याचा फायदा लोकसभा निवडणुकीत नकीच होणार आहे. भाजप पक्षासाठी अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश महत्वाचा ठरणार आहे.
राज्यभेत अशोक चव्हाण यांना भाजपने उमेदवारी दिली तर यामुळे काँग्रेसची मते फोडली जाऊ शकणार, त्यांच्या पक्ष प्रवेशाचा भाजपला मतदारांचा आकडा वाढवण्यात मदत होणार आहे. यापूर्वी, भाजप पक्षाने विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत हा प्रयोग केला होताएक ज्येष्ठ आणि अनुभवी नेता अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपची मराठवाड्यात ताकद वाढेल.
तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांचा सारखा दिग्गज नेता गळाला लागला, तर काँग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करून आणखी आमदार काँग्रेसचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडले जाऊ शकतात.