मुंबई – मुंबई भाजपचे अध्य्क्ष आशिष शेलार यांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. यावेळी मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावर भाष्य करत शेलार यांनी ‘पेंग्विन सेना’ असा उल्लेख करत एक ट्विट केलं आहे.
आपल्या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणतात,”देशातील सर्वात जुने विशेष आर्थिक क्षेत्र असलेल्या अंधेरीच्या सिप्झ मध्ये भारत सरकारकडून 200 कोटी खर्च करुन विशेष केंद्रीकृत सुविधा ( सीएफसी) उभारण्यात येत असून 5 लाख रोजगार आणि 30 हजार कोटींच्या निर्यातीचे उदिष्ट ठेवण्यात आलेय. नुकतीच त्याची पायाभरणी झाली. अशा आशयाचे ट्विट शेलार यांनी केले आहे.
देशातील सर्वात जुने विशेष आर्थिक क्षेत्र असलेल्या अंधेरीच्या सिप्झ मध्ये भारत सरकारकडून 200 कोटी खर्च करुन विशेष केंद्रीकृत सुविधा ( सीएफसी) उभारण्यात येत असून 5 लाख रोजगार आणि 30 हजार कोटींच्या निर्यातीचे उदिष्ट ठेवण्यात आलेय.
नुकतीच त्याची पायाभरणी झाली.
(1/2)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 4, 2022
दुसऱ्या ट्विटमध्ये शेलार म्हणतात, बीकेसीत भूमिगत बुलेट ट्रेन टर्मिनस त्यावर आयएफएससी उभे राहणार. सोबत 7 मेट्रो धावू लागतील. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आर्थिकदृष्ट्या बलवान होणार !आमचं ठरलंय ! पण पब, पेग आणि पार्टीवाल्या पेंग्विन सेनेला मुंबईतून सगळे गुजरातला जाते, असे ध्वनिप्रदूषण करण्याची नशाच चढलेय अशी मार्मिक टीका देखील शेलार यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे.
बीकेसीत भूमिगत बुलेट ट्रेन टर्मिनस त्यावर आयएफएससी उभे राहणार. सोबत 7 मेट्रो धावू लागतील. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आर्थिकदृष्ट्या बलवान होणार!आमचं ठरलंय!
पण
पब, पेग आणि पार्टीवाल्या पेंग्विन सेनेला मुंबईतून सगळे गुजरातला जाते, असे ध्वनिप्रदूषण करण्याची नशाच चढलेय!
(2/2)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 4, 2022
याआधी देखील आशिष शेलार यांनी थेट उद्धव ठाकरेंना पत्र लिहीत कमळाबाई म्हणता म्हणून आम्ही पेंग्विनसेना म्हणू का ? असा सवाल विचारला होता. शिवसेनेकडून याबाबत कोणतंही उत्तर आलं नव्हतं आता पुन्हा एकदा शेलार यांनी पेंग्विनसेना असा उल्लेख केल्याचे दिसून आले.