नवी दिल्ली – साधारणपणे प्रत्येक मनुष्याला आपल्या बँक खात्यामध्ये किती रक्कम आहे याची कल्पना असते पण नुकत्याच मिळालेल्या एका माहिती नुसार भारतातील तब्बल 26 कोटी बँक खाती निष्क्रिय असून या खात्यांवर गेल्या 10 वर्षात कोणताही व्यवहार झाला नाही या खात्यावरील रक्कम रिझर्व बँकेकडे वर्ग करण्यात आली असून ती रक्कम तब्बल 48268 कोटी रुपये एवढी आहे निष्क्रिय बँक खात्यांची टक्केवारी एकूण बँक खात्यांच्या संख्येच्या तब्बल 35 टक्के एवढी आहे जागतिक बँकेच्या वर्ल्ड फिनडेक्स रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली असून जगात सर्वात जास्त निष्क्रिय बँक खात्यांची संख्या भारतातच आहे.
कोणतेही बँक खाते जर दहा वर्ष निष्क्रिय असेल म्हणजे त्या खात्यावर कोणताही व्यवहार झालेला नसेल तर संबंधित बँक ते खाते रिझर्व बँकेकडे सुपूर्द करते त्याची रक्कमही रिझर्व बँकेकडे वर्ग केली जाते निष्क्रिय खात्यावरील ही रक्कम रिझर्व बँकेच्या डिपॉझिटर्स अवेअरनेस अँड एज्युकेशन या निधीकडे पाठवली जाते 30 मार्च 22 रोजी संपलेल्या वर्षात या निधीमध्ये भारतीय रिझर्व बँकेकडे तब्बल 48268 कोटी रुपये होते.
हा आकडा भारतातील त्रिपुरा मणिपूर किंवा मिझोराम या छोट्या राज्यांच्या वार्षिक योजने पेक्षा ही जास्त आहे आशा प्रकारच्या निष्क्रिय बँक खात्यांचे व्यवस्थापन करणे अतिशय अवघड असल्याने रिझर्व बँकेने काही वर्षापूर्वी सर्व बँकांना निर्देश देऊन निष्क्रिय खाते पुन्हा एकदा सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या पण या मोहिमेला पण प्रतिसाद मिळाला नाही उलट गेल्या काही वर्षांमध्ये निष्क्रिय बँक खात्यांची संख्या अधिकच वाढत चालली आहे कोणत्या तरी दबावामुळे किंवा एखादा योजनेखाली बँक खाते सुरू करणारे अनेक खातेदार नंतर हे खाते चालू ठेवत नाहीत त्यामुळेच निष्क्रिय बँक खात्यांची संख्या वाढते.
अशा निष्क्रिय बँक खात्यांचा वापर करून भ्रष्टाचार आणि फ्रॉड होण्याची भीती असल्याने रिझर्व बँकेने हा विषय गांभीर्याने घेतला आहे सरकारच्या विविध योजनांमुळे बँक खात्यांची संख्या वाढली आहे 2014 ते 17 या कालावधीमध्ये भारतातील बँक खात्यांची संख्या तब्बल 27 टक्क्यांनी वाढली आहे पण ही बँक खाती कायम चालू राहावीत याबाबत कोणतीही योजना नसल्यानेच नजीकच्या कालावधीमध्ये अनेक खाती निष्क्रिय होण्याचाही धोका आहे.
सरकारने काही वर्षांपूर्वी जनधन योजना सुरू करून प्रत्येकाला बँक खाते सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले होते मिळालेल्या माहितीनुसार जी खाती सध्या निष्क्रिय आहेत त्यामध्ये अशा जनधन खात्यांचा सर्वात जास्त समावेश आहे की बँक खाते निष्क्रिय झाली आहेत त्यापैकी तब्बल 42 टक्के बँक खाती ही महिलांची आहेत एकीकडे निष्क्रिय बँक खात्यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे अद्यापही देशातील मोठी लोकसंख्या अशी आहे ज्यांच्या नावावर अद्याप एकही बँक खाते नाही.