पुणे – पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेल्या विधानावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. शरजील यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात देशातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, राजकीय नेत्यांनी देखील उस्मानीयांचा विरोध दर्शवला आहे.
दरम्यान, हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानी यांना तातडीने अटक करून कारवाई करावी या मागणीसाठी पुणे शहर भाजपच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पुणे पोलीस कमिशनर ऑफिस येथे आज निवेदन देण्यात आले. यावेळी माहापौर मुरलीधर मोहळ, शहर अध्यक्ष जगदिश मुळीक,आ मुक्ता टिळक, भिमराव तापकीर, प्रदिप रावत, सिद्धार्थ शिरोळे आदी उपस्थित होते.