अकोला – भारतीय बौद्ध महासभा आयोजित अकोल्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एकंदरीतच सध्याच्या राजकीय स्थितीवरून टीका केली आहे.
ते भाषणा दरम्यान म्हणाले,’भारताची अर्थव्यवस्था दारुड्यासारखी झाली असून दारुड्या जसं एक-एक साहित्य विकतो तसाच देशाचा कारभार सुरु आहे. पंतप्रधानांना मी दारुडा म्हणत नाही. पण त्यांची वागणूक दारुड्यासारखी आहे.’ अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, त्यांच्या या टीकेवरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. भाषण दरम्यान ते पुढे म्हणाले, ‘दाडू इंदुरीकरांच ‘गाढवाचं लग्न’ हे नाटक बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिल्यानंतर त्यांचा मोठेपणा दिसून आला होता. राजकीय वैर न ठेवता मनाचा मोठेपणा जसा बाळासाहेब ठाकरेंमध्ये होता, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये आणि शरद पवारांमध्ये नाही,” अशी ते म्हणाले आहे.