ममता बॅनर्जी यांचा पंतप्रधान मोदींना सवाल
सिलीगुडी : शेजारी राष्ट्राचा नेहमी गौरव करत असता. मोदीजी तुमचे पाकिस्तानच्या राजदूत पदाचे पत्र कोठे आहे ? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केला. पश्विम बंगालमधील सिलीगुडी येथील राष्ट्रीय नागरिकत्व कायद्या (का) विरोधातील मेळाव्यात त्या बोलत होत्या.
स्वातंत्र्य मिळवून 70 वर्ष झाल्यावर देशाच्या नागरिकांना नागरिकत्व सिध्द करायला सांगणे लज्जास्पद आहे, असे त्या म्हणाला. संस्कृती आणि वारसा यांनी संपन्न असलेला भारत हा एक महान देश आहे. पंतप्रधान नेहमी आमच्या देशाची तुलनना पाकिस्तानशी का करतात… तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात की पाकिस्तानचे राजदूत… तुम्ही प्रत्येक मुद्द्यावर पाकिस्तानचा उल्लेख का करता? असा सवाला ममता बॅनर्जी यांनी केला.
एका बाजूला पंतप्रधान देशात एनआरसी लागू होणार नाही म्हणतात. तर दुसऱ्या बाजूला त्यांचे केंद्रीय गृह मंत्री आणि अन्यमंत्री एनआरसी देशभर होणार असल्याचे सांगत आहेत, हा दुतोंडीपणा कशासाठी सुरू आहे, असेही त्या म्हणाल्या.