कोलकाता – भारतीय जनता पक्षाला प. बंगालमध्ये लागलेली गळती अद्याप कायम आहे. अभिनेता आणि राजकारणी जॉय बॅनर्जी यांनी आपण पक्ष सोडत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कळवले आहे. मात्र, ते तृणमूल कॉंग्रेसमध्ये सहभागी होणार का? हे अद्याप स्पष्ट केले नाही.
आपण दोन वर्ष भेटण्यासाठी वेळ मागत आहोत, मात्र आपल्या भेट मिळत नसल्याने आपण हे पत्र पाठवत असल्याचे त्यात लिहले आहे. राजीव बॅनर्जी यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यावर आपण आक्षेप घेतला होता. त्यानंतरही बॅनर्जी यांनी पक्ष सोडला, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.