नवी दिल्ली – अमेरिकेतील पेंटॅगॉनच्या अहवालात चीनने अरुणाचल प्रदेशच्या हद्दीत साडेचार किमी घुसखोरी केली आहे असे नमूद करण्यात आले आहे. या अहवालाचा दाखल देत कॉंग्रेसने पंतप्रधान मोदींकडून माफीची मागणी करण्यात आली आहे.
भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही, असे विधान करून मोदींना चीनला क्लीन चीट दिली होती; पण प्रत्यक्षातील वस्तुस्थित पेंटॅगॉनच्या अहवालातून समोर आली आहे, असे कॉंग्रेसने म्हटले आहे. त्यामुळे मोदींनी आता माफी मागितली पाहिजे असे कॉंग्रेसने म्हटले आहे.
दरम्यान कॉंग्रेसच्या या दाव्यावर भाजपचे केंद्रीय मंत्री किरेन रिजीजु यांनी प्रत्युत्तर देऊन सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपल्या सरकारवर काहीं जण अविश्वास दाखवत आहेत आणि आपल्या लष्कराच्या क्षमतेवर काही जण शंका व्यक्त करीत आहेत. त्यांचा भारताच्या लष्करावर विश्वास दिसत नाही.
या संबंधात तत्कालीन संरक्षण मंत्री ए. के. ऍन्टोनी यांनी संसदेत सन 2013 साली जे उत्तर दिले आहे त्याची क्लीपही रिजेजू यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर टाकली आहे. दोन देशांमध्ये सीमाच नसणे ही संरक्षणासाठी अत्यंत चांगली बाब आहे असे अँन्टोनी यांनी त्यावेळी म्हटले होते त्याकडेही रिजीजु यांनी कॉंग्रेसचे लक्ष वेधले आहे.