पुणे – राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी व बारावीचे निकाल लवकर जाहीर करावेत, अशी मागणी खासगी विद्यापीठाच्या “पेरा’ इंडिया (प्रीमिनन्ट एज्युकेशन अँड रीसर्च असोसिएशन) या संघटनेने केली आहे.
याबाबत संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, उपाध्यक्ष भरत अग्रवाल आणि संघटनेचे सचिव प्रा. डॉ. ई. बी. खेडकर यांनी प्रश्न विचारला आहे. सीबीएसईचे निकाल जुलै अखेरपर्यंत जाहीर होतील.
मात्र, राज्य मंडळाने या निकालांच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात अधिक संभ्रम वाढला आहे. दरवर्षी मे अखेर बारावी बोर्डाचा निकाल जाहीर केला जातो.
मात्र यंदा जून संपत आला तरी निकालाची तारीख जाहीर झालेली नाही. याबाबत त्वरित निर्णय घेऊन पुढील प्रवेश प्रक्रियेला चालना द्यावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.