देहूरोड : ऐतिहासिक धम्मभूमीवरील बौद्ध विहाराच्या ६९ व्या वर्धापनदिनी हजारो बौद्ध बांधवांनी हजेरी लावत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वहस्ते स्थापन केलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीस अभिवादन केले.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्यासह राज्यातील कानाकोपऱ्यातून अभिवादन करण्यासाठी अनुयायी आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही धम्मभूमी परिसरात वेगवेगळ्या संघटनांच्यावतीने समाज प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय धम्मगुरु डॉ. ज्ञानज्योती महाथेरो यांचे स्वागत धर्मपाल तंतरपाळे, अशोक गायकवाड, मौना गायकवाड रंजना गायकवाड यांनी केले.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
बुद्धविहार कृती समितीच्यावतीने सकाळी बुद्धस्पास तर स्तूपास बसपाचे मावळ विधानसभा अध्यक्ष दीपक भालेराव यांच्या हस्ते पुष्पांजली वाहण्यात आली. धम्म रॅलीचे नेतृत्व विदर्भ धम्मभूमी सुरक्षा समितीचे अध्यक्ष संघपाल शिरसाट यांनी केले. रेल्वे मैदानावर प्राप्तिकर अधिकारी आनंदराव ओवाळ यांच्या हस्ते पंचशील ध्वजवंदन झाले, कृती समिती अध्यक्ष टेक्सास गायकवाड, माजी उपमहापौर तुषार हिंगे, माजी नगरसेवक डॉ. हुलगेश चलवादी यांनी स्वागत केले.
महाबुद्ध वंदनेचे
स्वागताध्यक्ष धम्मभूमीचे अनुवर्तक सयाजीराव गायकवाड होते. रंजना सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. बापूसाहेब गायकवाड यांनी आभार मानले. समाज प्रबोधन व महाभोजनदान वाकड येथील युवारत्न सेवा समितीच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त समाजप्रबोधन व महाभोजनदान हे कार्यक्रम घेण्यात आले. भिक्षू संघाचे प्रवचन, पुरस्कार वितरण, सत्कार समारंभ व पुणे जिल्हा कला विकास संघ यांच्या भीम गीतांचा महासंग्रामचे उद्घाटन पुणे सीआयडी अधिकारी सत्यम गाडे यांच्या हस्ते झाले, अशी माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष सचिन वाघमारे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अण्णा बोदडे, एम.टी. कांबळे, डॉ. सुशांत शिंदे, अरुण चाबुकस्वार, विजय उलपे, मनवर पंजाबराव, नितीन चंदनशिवे, भास्कर मोरे, सतीश हातोले उपस्थित होते.
भीमगीतांच्या कार्यक्रमाने आली रंगत
प्रसिद्ध गायक राहुल शिंदे, विशाल चव्हाण, संकल्प गोळे, रोमियो कांबळे, अमर पुणेकर, रोहित शिंदे, सुरेश गायकवाड यांनी भीमगीतांचा महासंग्राम कार्यक्रमामध्ये भीमगीते सादर केली. संयोजन सेवा समिती अध्यक्ष सचिन वाघमारे, शहाजी शिंदे, प्रेमचंद कांबळे, संदीप कांबळे, आकाश शिंदे, विशाल सुरवसे, शैलेश खेडकर, विठ्ठल पवार, राजन दहाने, युवराज गायकवाड, दिनेश कांबळे, बलराज गायकवाड, शिव लोहार, कुमार शेलार, भागवत माने, संदीप माने, कैलास राऊत, विलास मोरे यांनी केले.