Anant Ambani on Vantara Project | मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा ‘अनंत अंबानी’ लवकरच ‘राधिका मर्चंट’सोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्यांचा विवाहपूर्व सोहळा 1 ते 3 मार्च या कालावधीत गुजरात मधील जामनगर येथे पार पडत आहे. याआधी अनंत अंबानींच्या ‘वनतारा’ प्रेमाची खूप चर्चा झाली होती. ‘वनतारा’ म्हणजेच ‘स्टार ऑफ द फॉरेस्ट’ (जंगलाचा तारा) हा जखमी-शोषित वन्यप्राण्यांचे बचाव, उपचार आणि पुनर्वसन करण्याचा उपक्रम आहे. | Anant Ambani on Vantara Project
खरे तर अनंत अंबानी यांचे प्राण्यांबद्दलचे प्रेम खूप खोल आहे. त्यांचे लहानपणापासून प्राण्यांवर खूप प्रेम आहे. त्याने स्वतःच सांगितले आहे की यामध्ये त्याला सर्वात जास्त आनंद मिळतो. अनंत अंबानी लहान असताना त्यांची आई जखमी कबुतरांना वाचवायची आणि त्यांच्यावर उपचार करायची. जखमी गरुडाच्या बाळावरही त्यांनी उपचार केले. तिथून अनंत अंबानींचे प्राण्यांबद्दलचे प्रेम वाढत गेले.
‘वनतारा’ म्हणजे नेमकं काय? | Anant Ambani on Vantara Project
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाऊंडेशनने जामनगरमध्ये प्राणी कल्याणासाठी ‘वनतारा’ हा उपक्रम सुरू केला. हा ‘वनतारा’ इनिशिएटिव्ह जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्सच्या ग्रीन बेल्टमध्ये 3000 एकरमध्ये पसरलेला आहे. येथे बचाव आणि पुनर्वसन केंद्र 350 एकर जागेवर बांधले आहे.
‘वनतारा’ उपक्रमांतर्गत आतापर्यंत 200 हून अधिक हत्ती आणि हजारो पक्षी, सरपटणारे प्राणी आणि इतर प्राण्यांची सुटका करण्यात आली आहे. याशिवाय ‘वनतारा’मध्ये मगरी, बिबट्या, गेंडा या प्रमुख प्रजातींच्या पुनर्वसनाची व्यवस्थाही आहे.
आंतरराष्ट्रीय मान्यता – | Anant Ambani on Vantara Project
‘वनतारा’ इनिशिएटिव्ह भारतातील राष्ट्रीय प्राणीशास्त्र उद्यान, नागालँड प्राणीशास्त्र उद्यान, सरदार पटेल प्राणी उद्यान आणि आसाम राज्य प्राणी संग्रहालय इत्यादींशी सहयोग करते. वनतारा प्रोग्रामने व्हेनेझुएलन नॅशनल फाऊंडेशन ऑफ झू यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबतही काम केले आहे. हे स्मिथसोनियन आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ झूस अँड एक्वेरियम सारख्या सुप्रसिद्ध संस्थांशी देखील संबंधित आहे.
3-4 वर्षात विद्यापीठाची स्थापना होईल – | Anant Ambani on Vantara Project
अनंत अंबानी म्हणतात की, ‘हा उपक्रम त्यांची आवड आहे. कोविड काळात वन्यजीव बचाव केंद्र सुरू करण्यात आले. जखमी जनावरांचे तात्काळ संरक्षण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, मग ते देशात असो वा परदेशात, असे ते म्हणाले.
त्यांनी सांगितले की जखमी प्राणी जगातील सर्वोच्च प्राणीशास्त्रज्ञ आणि डॉक्टरांच्या मदतीने बरे होतात. रेस्क्यू सेंटरमध्ये जे लोक पशुवैद्यकीय विषयात पदवीधर आहेत त्यांना नोकऱ्या दिल्या जातील. येत्या 3-4 वर्षांत त्यांच्याकडे वन्यजीव पशुवैद्यकीय औषधांसाठी पूर्ण विद्यापीठ असेल, असे ते सांगतात.
हत्ती केंद्र – | Anant Ambani on Vantara Project
3000 एकरमध्ये पसरलेल्या ‘वनतारा’मध्ये अत्याधुनिक एलिफंट सेंटर देखील असेल. यात एक हायड्रोथेरपी पूल, वॉटर बॉडी आणि हत्तींच्या संधिवातावर उपचार करण्यासाठी जकूझी देखील असेल. येथे 500 लोकांचा प्रशिक्षित कर्मचारी हत्तींची काळजी घेतात.
त्यात 25 हजार स्क्वेअर फुटांचे रुग्णालयही आहे. यामध्ये सर्व प्रकारची आधुनिक उपकरणे आहे. येथे हत्तींवर शस्त्रक्रियाही करता येते. एलिफंट सेंटरमध्ये 14 हजार स्क्वेअर फुटांचे स्वयंपाकघरही आहे. केंद्रात आयुर्वेदाचाही वापर केला जातो.
बिबट्याला मिळाली दृष्टी – | Anant Ambani on Vantara Project
‘चेरी आय’ हे रेटिनॅक्युलममधील दोषांमुळे उद्भवतं. या दोषामुळे ग्रंथी डोळ्यापासून लाल मांसल वस्तुमानाच्या रूपात पुढे सरकते आणि बाहेर पडते. संवेदनशील ऊतक कोरडं झाल्यामुळे आणि बाह्य आघात झाल्यामुळे समस्या उद्भवतात. यामुळे जळजळ होते, सूज येते किंवा याचं रूपांतर संसर्गामध्ये होते.
उपचार न केल्यास, या स्थितीमुळे ड्राय आय सिंड्रोम आणि इतर गुंतागुंत होऊ शकतात. या प्रौढ नर बिबट्यावर वनतारा इथं शस्त्रक्रिया करण्यात आली. सामान्य भूल देऊन त्याचं चेरी आय काढून टाकण्यात आलं. शस्त्रक्रियेनंतर बिबट्याला योग्य दृष्टी मिळत आहे.
‘वनतारा’ प्रोजेक्ट का आहे वेगळा? | Anant Ambani on Vantara Project
हा एक व्यावसायिक कुटुंबाचा एक प्रयत्न आहे. प्रत्येक व्यावसायिक कुटुंब फक्त नफ्यासाठी काम करत असतं. पण ‘वनतारा’ प्रकल्प यापेक्षा वेगळा आहे. खुद्द अनंत अंबानी यांनीच याचा खुलासा केला आहे.
“आमची प्राथमिकता पीडित प्राण्यांचे कल्याण आहे आणि रक्षण करणे आहे. अनंत अंबानी यांनी सांगितलं की, वन्यजीव शिक्षण आणि बचाव प्रयत्नांना समर्पित आमचे आगामी प्राणीसंग्रहालय लवकरच अभ्यासकर्त्यांचे स्वागत करेल.” असं ते म्हणतात.
आई नेहमीच माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरली – | Anant Ambani on Vantara Project
अनंत अंबानी म्हणतात की, “माझी आई नेहमीच माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. मी लहान असताना माझी आई मला नेहमी सांगायची, प्राण्यांची काळजी घ्या.” याबद्दल ते म्हणाले, “वन्यजीव धोक्यात येत आहेत आणि आमच्याकडे 50-60 हून अधिक धोक्यात असलेल्या प्रजाती आहेत ज्यांना आम्ही सर्व भागातून वाचवले आहे. आमचे लक्ष हे आहे की भारतात एकही वन्य प्राणी बंदिवासात राहू नये किंवा कोणत्याही वन्य प्राण्यावर उपचार केले जाऊ नयेत.” | Anant Ambani on Vantara Project