मुंबई – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत राज्यभर “सावरकर गौरव यात्र’ काढणार असल्याची घोषणा होती. आता या यात्रेला येत्या 30 मार्चपासून प्रारंभ होणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.
या यात्रेच्या आयोजनावरून विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी या यात्रेवर टीका केली आहे. सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तर मिळत असतील तर आम्ही या यात्रेचं स्वागत करू असे ते म्हणाले.
माध्यमांशी बोलतांना अमोल कोल्हे म्हणाले,’राहुल गांधींनी मागच्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान काही प्रश्न मोदी सरकारला विचारले होते. त्या प्रश्नांची उत्तरं अद्यापही देशाला मिळालेली नाहीत. जर सावरकर गौरव यात्रा काढून त्या चार प्रश्नांची उत्तरं मिळत असतील, तर अशी यात्रा नक्कीच काढावी”, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली.’ असेही ते म्हणाले.