Amit Shah Challenge on Uddhav Thackeray । नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) नियमांची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली. CAA च्या नियमांबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने ही अधिसूचना जारी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) नियमांची अधिसूचना जारी करणे हा केंद्र सरकारचा मोठा निर्णय आहे. यावरून विरोधी पक्ष नेत्यांनी भाजप सरकारवर टीका केली या टीकेवर आता वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिउत्तर दिल आहे.
#WATCH | On CAA notification, Union Home Minister Amit Shah says, “…There is no need for minorities or any other person to fear because there is no provision in CAA to take away anyone’s citizenship. CAA is only to give rights and citizenship to Hindus, Buddhists, Jains, Sikhs,… pic.twitter.com/xuUWDXfW6e
— ANI (@ANI) March 14, 2024
उद्धव ठाकरे नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणाले होते,’ मोदी सरकारने अपयश झाकण्यासाठी हा कायदा आणला आहे.’ यावरून वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत प्रश्न विचारला असता. अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिल आहे.
अमित शाह म्हणाले,’मी उद्धव ठाकरेंना विचारु इच्छितो, तुम्हाला हा कायदा हवा की नको हे स्पष्ट करा. उद्धव ठाकरे हे सांगू इच्छितात की कायदा नको? देशाच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या जनतेपुढे हे मी आव्हान देतो की त्यांनी हे स्पष्ट करावं की हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन शरणार्थींना नागरिकत्व देणारा कायदा यायला नको. उद्धव ठाकरेंनी हे सांगितलं आहे.
ते पुढे म्हणाले,’कोणीही राजकारण करु नका, मी थेट उद्धव ठाकरेंना विचारतो आहे की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करा. उद्धव ठाकरेंना अल्पसंख्याकांची मतं हवी आहेत म्हणून ते राजकारण करत आहेत. आमची पहिल्या दिवसापासून ही भूमिका आहे की देशाची फाळणी झाल्यानंतर जे लोक भारतात शरणार्थी म्हणून आले आहेत त्यांना नागरिकत्व मिळालं पाहिजे.’ असं म्हणत शाह यांनी ठाकरेंना ओपन चॅलेंज दिल आहे.
हे वाचाल का ? नमो ड्रोन दीदीची निवड कशी केली जाते ? अर्जापासून ते इतर सर्व महत्त्वाचे डिटेल्स जाणून घ्या एका क्लिकवर