Shark Tank India 3 In Dadasaheb Bhagat| आयुष्यात यशाच्या शिखरापर्यंत पोहचण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. अनेक जण कष्ट, जिद्द आणि संयम ठेऊन यशस्वी होतात. अशाच बीडमधील एका तरूणाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. 10वी उत्तीर्ण झालेल्या या तरुणाने एकेकाळी ऑफिसबॉय म्हणूनही नोकरी केली. पण आज त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर कंपनी सुरू केली आहे.
इन्फोसिस कंपनीत ऑफिस बॉयची नोकरी
या तरुणाचे नाव आहे दादासाहेब भगत. त्यांचा जन्म 1994 मध्ये बीडमध्ये झाला आहे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्यातून आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यावेळी त्यांना नोकरीची नितांत गरज होती, म्हणून ते 2009 मध्ये इन्फोसिसच्या गेस्ट हाऊसमध्ये ऑफिस बॉय म्हणून रुजू झाले. त्यांना 9000 रुपये पगार मिळत असे. चहा-पाणी पुरविण्यापासून ते झाडून पुसण्यापर्यंत साफसफाई करावी लागत होती. ते शिपाई म्हणून काम करत असल्याचे त्याने घरच्यांना सांगितले नाही. इन्फोसिसमध्ये काम करताना त्याला सॉफ्टवेअरचं महत्त्व कळलं. यानंतर त्यांनी ते शिकायचं ठरवलं.
त्यानंतर ते संगणक आणि त्याच्या तंत्रज्ञानाशी संबंधित तपशील शिकू लागला. तो रात्री काम करायचा आणि दिवसा कोडिंग, ग्राफिक्स डिझायनिंग आणि ॲनिमेशनचा अभ्यास करायचा. नोकरीसोबतच त्याने C++ आणि Python चा कोर्स केला. तो ग्राफिक्स, व्हीएफएक्स, मोशन ग्राफिक्स शिकला. त्याला एका मोठ्या कंपनीत नोकरीही लागली, पण अचानक त्यांचा अपघात झाला. त्यामुळे त्यांना गावी जावे लागले.
कशी केली सुरुवात?
दादासाहेब मित्राकडून भाड्याने लॅपटॉप घेऊन गावी गेले. येथून त्यांनाव्यवसायाची कल्पना सुचली. त्यांनी ग्राफिक्स डिझाईनसाठी नवीन सॉफ्टवेअर तयार केलं, जे कॅनव्हासारखं आहे. त्यांनी आपले टेम्पलेट्स ऑनलाइन विकण्यास सुरुवात केली. त्यांनी स्वतःच्या कंपनीचे डिझाइन टेम्पलेट बनवले आणि त्याचे प्लॅटफॉर्म ग्राफिकल टेम्पलेट्स विकण्यास सुरुवात केली. त्याने Ninthmotion, DooGraphics नावाच्या दोन कंपन्यांची स्थापना केली. आज त्यांच्या कंपनीचे मूल्यांकन 10 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक
नुकताच दादासाहेब शार्क टँकच्या तिसऱ्या सीझनमध्ये झळकला होता. त्याच्या कंपनीचं व्हॅल्युएशन आता 10 कोटी रुपये झाले. शार्क टंकमध्ये त्यांनी 2.5 टक्के इक्विटीच्या मोबदल्यात 1 कोटींची मागणी केली होती. बोटचे को-फाऊंडर अमन गुप्ता यांनी त्याच्या कंपनीतील 10 टक्क्यांच्या मोबदल्यात 1 कोटींची रक्कम देण्याचे निश्चित केले. इतकेच काय तर बीडच्या या तरुणाच्या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ‘मन की बात’ मध्ये कौतुक केले होते.
हेही वाचा: