श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- आजची तरुणपिढी चुकीच्या मार्गाने चाललेली दिसत आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष चालणार नाहीत. परमार्थ हा खरा ठेवा आहे, असा उपदेश महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी दिला.
उक्कलगाव येथे येथे चैत्र शुद्ध प्रतिपदेला श्री हरिहर केशव गोविंद भगवान यात्रात्सेवानिमित्त कीर्तनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पंचांगातील पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा तसेच त्यापासून चैत्र ते फाल्गुनपर्यंत हे बारा महिने पूर्ण होते.
शालीवहनशक असे नवीन वर्ष सुरू होते. शक नावाचे राजे आधीच्या काळात राज्य करत होते. मात्र महाराष्ट्राला पहिला मराठी राजा आठशे वर्षांपूर्वीच्या काळात शालिवहन राजा मिळाला. जीवन सुखी करायचे असेल तर व्यक्तीगत पुण्य लागते.
संताने आनंद उपभोगला, मात्र इतरांच्या सुखाचा विचार केला. चंदनाच्या झाडाला तुमच्यासारख्याची गरज नसते. परमार्थाच्या चरणात खरी सुख भक्ती मिळते. संयम पाळला तर माणूस निश्चित यशस्वी वाटचाल करेल, असे मंहत मंडलिक यांनी सांगितले.