नाशिक – महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अजित पवार अर्थमंत्री असताना मोठी मदत झाली, असे मोठे वक्तव्य ग्रामविकास गिरीश महान यांनी नाशिकमध्ये केले आहे. यावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आले असून चर्चा सुरू आहे. त्यामुळे लवकरच निर्णय होईल, असेही महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
महाजन रविवारी नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी व्यापारी गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर पत्रकरांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी अनेक विषयांवर त्यांनी चर्चा केली. ते म्हणाले कि, शिवसेनेच्या कोणत्या मंत्र्यांवर भाजप नाराज असे काहीही नाही. शिवसेनेचा निर्णय मुख्यमंत्री घेत आहेत.
तसेच, सकाळच्या भोंग्याशिवाय ठाकरे गटाकडे कोणीही कोणीही नाही. अनेक आमदार-खासदारही पुढे त्यांना सोडून जाणार असल्याचे ते म्हणाले. तसेच एपीएमसी ऍक्ट रद्द करण्याची व्यापाऱ्यांची मागणी होत आहे. यावर महाजन म्हणाले की, सहकार मंत्र्यासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच औरंगजेबाच्या कबरीवर भेट दिली. यावर महाजन म्हणाले की, कोणीही याचे समर्थन करणार नाही, मतांचे लांगल-चालण चालले आहे. ठाकरेंचे याला समर्थन आहे का? प्रकाश आंबेडकर आधी कॉंग्रेसच्या त्यानंतर शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले. त्यामुळे आंबेडकरांबाबत ठाकरेंनी आपली भूमिका आता स्पष्ट करावी.